अटल बिहारी वाजपेयी मराठी माहिती । Atal Bihari Vajpayee Biography in Marathi

अटल बिहारी वाजपेयी । Atal Bihari Vajpayee Biography in Marathi

Atal Bihari Vajpayee Biography in Marathi: अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पूर्व प्रधानमंत्री होते. ते त्यांचं संपूर्ण जीवन राजकारणात सक्रिय होते. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे एक मात्र असे कार्यकर्ते होते ज्यांनी लागोपाठ तीन वेळा प्रधानमंत्री हे पद सांभाळले होते. ते भारताचे सन्माननीय आणि प्रेरणादायी राजकारणी होते. वाजपेयी यांनी विविध परिषदा व संघटनेमध्ये सदस्य म्हणून काम केले. अटल बिहारी वाजपेयी हे एक स्पष्ट वक्ता आणि प्रभावशाली कवी होते. एका कार्यकर्त्याच्या रूपात त्यांना स्वच्छ प्रतिमा, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांसाठी ओळखले जाते. 2015 मध्ये त्यांना भारताचे सर्वोच्च नागरिक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

  • जन्मः 25 डिसेंबर 1924, ग्वालियर, मध्यप्रदेश.
  • मृत्यु: 16 ऑगस्ट , 2018 (वय 93), एम्स हॉस्पिटल, नवी दिल्ली, भारत.
  • कार्य/पद: राजकारणी, भारताचे पूर्व प्रधानमंत्री.
  • पुरस्कार : भारत रत्न, 2015.

आरंभिक जीवन | Early Life of Atal Bihari Vajpayee in Marathi

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशच्या ग्वालियर मध्ये 25 डिसेंबर 1924 ला झाला. ते त्यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवी यांच्या सात मुलांपैकी एक होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे वडील एक विद्वान शालेय शिक्षक होते. वाजपेयी यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी लक्ष्मीबाई कॉलेज आणि कानपूर मध्ये डी ए वी कॉलेजला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लखनऊ मधून अर्ज केला पण ते पुढील शिक्षण चालू ठेवू शकले नाही. त्यांनी आर.एस.एस द्वारे प्रकाशित केलेल्या मासिकात संपादक म्हणून नोकरी पत्करली.

वाजपेयी यांनी लग्न केले नाही पण बी एन कौल यांच्या दोन मुली नमिता आणि नंदिता यांना दत्तक घेतले.

करियर | Career of Atal Bihari Vajpayee in Marathi

Career of Atal Bihari Vajpayee in marathi
Career of Atal Bihari Vajpayee in marathi

वाजपेयी यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून झाली. 1942 मध्ये ‘भारत छोडो आंदोलन’ मध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना इतर कार्यकर्त्यांसोबत अटक करण्यात आली. त्याचवेळी त्यांची भेट शामप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत झाली, जे भारतीय जनसंघ म्हणजेच बी जे एस चे कार्यकर्ते होते. त्यांच्या राजकीय अजेंड्यामध्ये वाजपेयी यांनी सहयोग केला. स्वास्थ्य संबंधित समस्यांमुळे मुखर्जी यांचे लवकरच निधन झाले व बी जे एस(Bharatiya Jana Sangh) ची कमान वाजपेयी यांनी सांभाळली आणि संघटनेचे विचार व अजेंड्याला पुढे घेऊन गेले.

ते 1954 मध्ये बलरामपुर सीट मधून संसद सदस्य म्हणून निवडून आले. कमी वय असताना सुद्धा वाजपेयी यांचे व्यापक दृष्टिकोन आणि माहितीने त्यांना राजकारणाच्या जगात सन्मान आणि जागा मिळवून दिली. 1977 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार आले तेव्हा वाजपेयी यांना विदेश मंत्री बनविण्यात आले. दोन वर्षानंतर ते चीन सोबत संबंधांवर चर्चा करण्यासाठी चीनला गेले. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामुळे प्रभावित झालेल्या भारत पाकिस्तानच्या व्यापारीक नात्याला सुधारण्यासाठी ते पाकिस्तानला गेले व एक नवीन उपक्रम केला.

जेव्हा जनता पार्टीने आर एस एस वर हल्ला केला तेव्हा त्यांनी 1979 मध्ये मंत्री पदावरून राजीनामा दिला. 1980 मध्ये, भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करण्याचा पुढाकार त्यांनी आणि बी जे एस आणि आर एस एस मधून आलेल्या लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांसारख्या त्यांच्या साथीदारांनी घेतला होता. स्थापना झाल्यानंतर पहिले पाच वर्ष वाजपेयी हे या पार्टीचे अध्यक्ष होते.

भारताचे प्रधानमंत्री म्हणून 1996 ला लोकसभा निवडणुकीनंतर बी जे पी ला सत्तेमध्ये यायची संधी मिळाली आणि अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री म्हणून निवडून आले. पण बहुमत सिद्ध केले नाही म्हणून सरकार पडली आणि वाजपेयी यांना प्रधानमंत्री या पदावरून फक्त 13 दिवसांमध्ये राजीनामा द्यावा लागला.

1998 च्या निवडणुकीत, विविध पक्षांच्या युती असलेल्या नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स सोबत सरकार स्थापन करण्यात भाजपला पुन्हा एकदा यश आले, पण या वेळेस सुद्धा फक्त 13 महिन्यांसाठी ते सत्तेमध्ये राहिले, कारण ऑल इंडिया द्रविड़ मुनेत्र कज़गम(All India Anna Dravida Munnetra Kazhagam) यांनी आपले समर्थन सरकारकडून परत घेतले. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेले एन.डी.ए सरकार ने मे 1998 मध्ये राजस्थानच्या पोकरण मध्ये परमाणु परीक्षण करून घेतले.

1999 च्या लोकसभा निवडणुकी नंतर नेशनल डेमोक्रेटिक अलायन्स (एन. डी. ए.) ला सरकार बनवण्यात यश मिळाले व अटल बिहारी वाजपेयी परत एकदा प्रधानमंत्री बनले. यावेळेस सरकारने आपले पाच वर्षे पूर्ण केले व असं करणारे पहिले बिगर काँग्रेसी सरकार बनले. सहयोगी पक्षांच्या मजबूत समर्थनाने वाजपेयी यांनी आर्थिक क्षेत्र सुधारण्यासाठी आणि खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी खूप योजना सुरू केल्या. त्यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये राज्यांचा हस्ताक्षेप मर्यादित करण्याचा प्रयत्न केला.

वाजपेयींनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आणि संशोधनाला चालना दिली. त्यांच्या नवीन विचारांमुळे आणि वेगवेगळ्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा त्वरित विकास झाला. पाकिस्तान आणि यु एस ए सोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवून त्यांच्या सरकारने द्विपक्षीय संबंधांना जास्त मजबूत केले. अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र धोरणांमध्ये जास्त बदल घडवू शकले नाही परंतु या धोरणांचे खूप कौतुक झाले.

आपले पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर एन डी ए युती पूर्ण आत्मविश्वासाने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 2005 च्या निवडणुकीत उतरले पण यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यू पी ए युतीला यश मिळाले आणि यू पी ए युतीचे सरकार बनले.

डिसेंबर 2005 ला अटल बिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली.

वैयक्तिक जीवन | Personal Life of Atal Bihari Vajpayee in Marathi

वाजपेयी सर्व जीवन अविवाहित राहिले. त्यांनी राजकुमारी कौल आणि बीएन कौल ची मुलगी नमिता भट्टाचार्य ला दत्तक घेतलं होते.

मृत्यु :-

2009 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्याच्यानंतर त्यांचे स्वास्थ्य बिघडत गेले. 11 जून 2018 ला त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)मध्ये भरती करण्यात आले व 16 ऑगस्ट 2018 ला त्यांचे निधन झाले. 17 ऑगस्टला त्यांची दत्तक मुलगी निमित्त कौल भट्टाचार्य यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. राजघाटच्याजवळ शांतीवन मध्ये त्यांची समाधी बनवण्यात आली आहे. अटलजी त्याची शेवटची यात्रा अतिशय भव्य रूपाने काढली गेली होती. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शेकडो नेते चालत गंतव्यस्थानावर पोहोचले. वजपेयच्या मृत्यूबद्दल संपूर्ण भारतामध्ये सात दिवसांच्या राज्य शोकांची घोषणा करण्यात आली होती. त्याचा मृत्यूचे शोक अमेरिका, चीन, बांगलादेश, ब्रिटन, नेपाळ आणि जपान या जगातील अनेक राष्ट्रांनी व्यक्त केला. अटलजी यांच्या अस्थी देशाच्या सर्व प्रमुख नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आली होती.

पुरस्कार आणि सन्मान | Awards

  • देशाची अभूतपूर्व सेवा करण्यासाठी त्यांना 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • 1993 मध्ये त्यांना कानपूर विद्यापीठाच्या डॉक्टरेट पदवीचा सन्मान प्राप्त झाला.
  • 1994 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1994 मध्ये पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार त्यांना प्रदान केला गेला.
  • 1994 मध्ये सर्व सर्वोत्तम संसद म्हणून सन्मानित.
  • 2015 मध्ये देशाचे सर्वोच्च नागरिक सन्मान, ‘भारत रत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • 2015 मध्ये बांगलादेशद्वारे ‘लिबरेशन वार अवॉर्ड’ दिले गेले.

टाईम लाईन (जीवन घटनाक्रम)

  • 1924: अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म ग्वालियर शहरात झाला.
  • 1942: भारत छोडो आंदोलनात सहभागी झाले.
  • 1957: पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत निवडून आले.
  • 1980: बी जे एस आणि आर एस एस च्या कार्यकर्त्यांसोबत मिळून बी जे पी ची स्थापना केली.
  • 1992: देशाच्या विकासासाठी योगदान दिल्यामुळे पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • 1996: पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री बनले.
  • 1998: दुसऱ्यांदा भारताचे प्रधानमंत्री बनले.
  • 1999: तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आणि दिल्ली ते लाहोर बस सेवा सुरू केली आणि नवीन इतिहास घडवला.
  • 2005: डिसेंबर महिन्यात राजकारणातून संन्यास घेतला.
  • 2015: देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान ,’भारतरत्न’ या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • 2018: 11 जून 2018 मृत्यू.

Final Words

तर मित्रांनो हि होती भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची कहाणी. तुम्हाला आमचा हा लेख कसा वाटला कंमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जून कोणत्याही विषयवार लेख हवा असेल तर ते देखील कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Biography of Sardar Vallabh Bhai Patel in Marathi

Leave a Comment